Wednesday 30 October 2013

"जी माणसे हवीशी वाटतात, ती कधी भेटत नाही..." "जी माणसे नकोशी वाटतात, त्यांचा सहवास संपत नाही..." "ज्यांच्याकडे जावेशे वाटते, त्यांच्याकडे जायला जमत नाही..." "ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते, त्यांच्याकडे जावेच लागते..." "जेंव्हा जीवन नकोसे वाटते, तेंव्हा काळ संपत नाही..." "जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो, तेंव्हा काळ संपलेला असतो..." "नशीब हे असच असते, त्याच्याशी जरा जपून वागाव लागत..." "तिथे कोणाचेच चालत नाही, जिकडे नेईल तिकडे जावेच लागत..." नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटे असलो तरी, सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब" कोणी दुसरं लिहित नसतं, आपल नशीब आपल्याच हाती असतं, येताना काही आणायच नसतं, जाताना काही न्यायचं नसतं, मग हे "आयुष्य" तरी कोणासाठी जगायचं असतं, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी "जन्माला" यायचं असतं.....

No comments:

Post a Comment