Thursday 24 October 2013

"चांगली वस्तु", "चांगली व्यक्ती" व "चांगले दिवस" यांची किंमत" निघुन गेल्यावर समजते... "प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे... तोच खरा "श्रीमंत". चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत. .आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत....!!

No comments:

Post a Comment